औरंगाबाद रेल्वेमार्गाचा जूनअखेर श्रीगणेशा ??????
Gautam.sancheti@timesgroup.com
जळगावः चाळीसगाव-दौलताबाद या ८८.२० किलोमिटर पर्यंत रेल्वे मार्गाचे काम जूनअखेर सुरू होणार असून या रेल्वेमार्गामुळे जळगावहून थेट औरंगाबादला जाता येणार आहे. या रेल्वेमार्गामुळे जळगाव ते औरंगाबाद हे अंतर ९३ किलोमिटरने कमी होणार आहे. आधी जळगावहून रेल्वेमार्गाने औरंगाबाद जाण्यासाठी मनमाडमार्गे जावे लागत असे त्यांचे अंतर हे २७४ किलोमिटर होते, आता मात्र चाळीसगावमार्गे हेच अंतर जळगावहून १८१ किलोमिटर इतकेच असणार आहे.
रेल्वे...
more... अर्थसंकल्प २०१४ मध्ये ह्या रेल्वे मार्गाला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर या कामाला गती देण्यात आली असून रेल्वेने या मार्गावरील औट्रम घाटातील १३ किलोमिटरच्या बोगद्याचे काम स्वित्झर्लंडच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रेल्वे मार्गात प्रस्तावित दौलताबाद, वरझडी, देवळाणा, टापरगाव, बहिरगाव, पाथर्डे, रांजणगाव व चाळीसगाव या आठ रेल्वेस्थानकांचा समावेश असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दिली. या रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने केले तर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होऊ शकणार आहे. या रेल्वेमार्गामुळे औरंगाबाद ते दिल्ली हे अंतरही ८५ किलोमिटरने कमी होणार आहे. तसेच चाळीसगाव रेल्वेस्थानकाचेही महत्त्व वाढणार आहे. येथून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग असून आता औरंगाबादची भर त्यात पडणार आहे. रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व नॅशनल हायवे मिळून या रेल्वे मार्गाचे काम केले जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे खान्देश थेट मराठवाड्याला कनेक्ट होणार असून त्यामुळे व्यापार व इतर क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे मनमाडमार्गे औरंगाबादला जाण्यासाठी लागणारा ६ तासाचा वेळ निम्यापेक्षा कमी होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे भुसावळ-औरंगाबाद स्पेशल ट्रेन चाळीसगावमार्गे सुरू होऊ शकते. औरंगाबाद ते धुळे या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते चाळीसगाव हा नवा रेल्वेमार्ग याच महामार्गाच्या बाजूने असणाऱ्या अतिरिक्त जागेतून जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणचा (एनएचएआय) सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यातील चाळीसगाव
दौलताबाद या रेल्वेमार्गाला मान्यता देण्यात आली आता जूनअखेर हे काम सुरू होणार आहे. औट्रम घाटापासून कामाला सुरुवात होणोर असून पहिल्या टप्यात घाटातील १३ किलोमिटर बोगद्याचे काम केले जाणार आहे.